महाराष्ट्रात या ठिकाणी पाऊस पडणार पहा हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसाने महाराष्ट्रात आगमन केले आहे. महाराष्ट्र मध्ये अमरावती व विदर्भामध्ये पावसाचं आगमन झालेला आहे. विदर्भामध्ये नुकताच मान्सून दाखल झालेला आहे.

महाराष्ट्रात या ठिकाणी पाऊस पडणार पहा हवामान विभागाचा अंदाज

पाऊस कधी पडेल

महाराष्ट्र मध्ये उत्तरेकडे जळगाव या ठिकाणी मान्सून नुकताच दाखल झालेला आहे परंतु मान्सून पुढे अजून सरकलेला नाही परंतु येत्या चार-पाच दिवसांमध्ये मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. म्हणजेच आता मान्सून उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे आता जळगावच्या उत्तरेकडे लवकरच पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात पाऊस कधी पडेल

गेल्या दोन दिवसापासून विदर्भामध्ये मान्सून दाखल झालेला असून. विदर्भामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. परंतु मान्सून दाखल होऊन सुद्धा विदर्भामध्ये पुरेसा पाऊस अजून पडत नाहीये. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भामध्ये पूर्ण ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पूर्व विदर्भ मध्ये उद्या किंवा परवा मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु पश्चिम विदर्भामध्ये अजून दोन-चार दिवस तरी पाऊस पडण्याची शक्यता नाही. पुढील चार-पाच दिवसांमध्ये बुलढाण्यामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुढील दोन दिवसात या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनचे आगमन अमरावती या ठिकाणी झालेल्या असून लवकरच महाराष्ट्र मध्ये सर्व ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या मान्सून जळगाव या ठिकाणी पोहोचलेला आहे. परंतु जळगाव पासून पुढे अजून पाऊस सरकलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील पुढील भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता येत्या चार ते पाच दिवसांमध्ये आहे.

विदर्भात या ठिकाणी पडेल पाऊस

सध्या मान्सूनच्या आगमन विदर्भामध्ये झालेले असून आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत विदर्भामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या तीन ते चार दिवसांमध्ये विदर्भामध्ये मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार आहे त्यामुळे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला चार ते पाच दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील इतर भागात पाऊस कधी पडेल

सध्या मान्सूनच्या आगमन दक्षिणेकडे आलेले आहे परंतु येत्या तीन ते चार दिवसांमध्ये बीड बुलढाणा जळगाव धाराशिव वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण राज्यामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे हा पाऊस येणार आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यामध्ये सध्या ढगाचे प्रमाण दाटून आलेले आहे त्यामुळे त्या चार ते पाच दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वरील जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणात पाऊस कधी पडेल

कोकणामध्ये सध्या पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी रत्नागिरी या भागांमध्ये किंवा सिंधुदुर्ग रायगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी रायगड मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होणार

रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट लागू करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सातारा व पुणे या दिशेने सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कोल्हापूर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वरील ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागांनी केले आहे.

मुंबई व ठाणे या ठिकाणी कधी पडणार पाऊस

मुंबई व ठाणे या ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये क्वचितच किंवा थोड्याशा हलक्या पावसाचे धारा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.